Thursday, September 13, 2012

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव हवाच



लवकरच बाप्पा आपल्या भेटीस येत आहेत.मराठी माणंसामध्ये गणेशोत्सवाचा आनंद काही वेगळाच असतो.या सणासाठी जशी सासुरवाशीनींना माहेरी जाण्याची ओढ लागते तशीच ओढ नोकरी-धंद्यामुळे विखूरलेल्या मराठीजनांना आपल्या गावी जाण्यासाठी लागते.

सध्या या उत्सवाला व्यावसायिक रूप येऊ लागले आहे.गणेशोत्सवाचे मुळ स्वरूप बदलत चालले आहे.व्यसनाच्या जाहिराती गणेश मंडळाच्या कमानीवर झळकू लागल्या आहेत.आजकाल तर शहरासोबत ग्रामीण भागातही डॉल्बीचे स्त्रोम माजले आहे.डॉल्बी वाजविताना वृध्द लोक,गरोदर स्त्रिया,लहान मुले यांचा विचार न करता तरूण मंडळी आपल्या नाचगाण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत

डॉल्बीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सरकारने आता सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी वाजविण्यावर बंदी आणणे गरजेचे आहे.डॉल्बीऐवजी पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे ग्रामीण कलाकारांना संधी मिळेल तसेच आपल्या संस्कृतीचे जतनही होईल.          

No comments:

Post a Comment