Thursday, September 13, 2012

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव हवाच



लवकरच बाप्पा आपल्या भेटीस येत आहेत.मराठी माणंसामध्ये गणेशोत्सवाचा आनंद काही वेगळाच असतो.या सणासाठी जशी सासुरवाशीनींना माहेरी जाण्याची ओढ लागते तशीच ओढ नोकरी-धंद्यामुळे विखूरलेल्या मराठीजनांना आपल्या गावी जाण्यासाठी लागते.

सध्या या उत्सवाला व्यावसायिक रूप येऊ लागले आहे.गणेशोत्सवाचे मुळ स्वरूप बदलत चालले आहे.व्यसनाच्या जाहिराती गणेश मंडळाच्या कमानीवर झळकू लागल्या आहेत.आजकाल तर शहरासोबत ग्रामीण भागातही डॉल्बीचे स्त्रोम माजले आहे.डॉल्बी वाजविताना वृध्द लोक,गरोदर स्त्रिया,लहान मुले यांचा विचार न करता तरूण मंडळी आपल्या नाचगाण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत

डॉल्बीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सरकारने आता सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी वाजविण्यावर बंदी आणणे गरजेचे आहे.डॉल्बीऐवजी पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे ग्रामीण कलाकारांना संधी मिळेल तसेच आपल्या संस्कृतीचे जतनही होईल.          

गुटखाबंदीचा महाराष्ट्र शासनाचा स्वागतार्ह निर्णय


महाराष्ट्र सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला याबद्दल सर्वप्रथम शासनाचे आभार.या पदार्थामधील निकोटीन या घटकामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजार होतो.आजच्या तरूण पिढीमध्ये हे पदार्थ खाण्याचे प्रमाण खूपच आहे.

कॅन्सरसारख्या आजारामुळे आई-वडिलांना आपल्या तरूण मुलाला गमाविण्याची वेळ येते.ज्या वयात आई-वडिलांना आधार देणे गरजेचे आहे त्याच वयात मुलासाठी आक्रोश करण्याची वेळ पालकांवर येते यापेक्षा मोठे दु:ख ते कोणते ?

गुटखा आणि पानमसाल्यावर  बंदी आणल्यामुळे गुटखा उत्पादकांनी मावा,सुपारीमिश्रीत गुटखा असे पदार्थ बाजारात आणले आहेत.या सर्वच पदार्थावर बंदी आणणे गरजेचे आहे,तसेच परराज्यातून गुटखा आणून महाराष्ट्रात काळ्या बाजारात विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे,तरच बंदीचा फायदा होईल,नाहीतर व्यापारी लोकांना काळ्याबाजारात असे पदार्थ विकून बक्कळ पैसा कमाविण्याचे आणखी एक साधन मिळेल.