Thursday, August 9, 2012

अण्णांच्या भष्ट्राचारविरोधी आंदोलनाची इतिश्री

भष्ट्राचारविरोधी आंदोलनाची इतिश्री

लोकपाल आंदोलन तडीस नेण्याची गर्जना करणाऱ्या टीम अण्णाने शेवटी नांगी टाकलीच.या टीमने भीमगर्जना करत निवडणूकीत सामील होण्याची घोषणा केली.निवडणूकीमुळे या मंडळीचा भष्ट्राचाराचा मुळ मुद्दाच बाजूला होण्याची शक्यता जास्त आहे.

कारण निवडणूकीसाठी ही मंडळी कोणाचा पैसा वापरणार आहेत हेच मोठे गुढ आहे.कारण भष्ट्र मंडळी,काळा पैसावाले,लुटारू व्यावसायिक हेच आपल्या फायद्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना देणग्या देतात.

या टीममधील मंडळीच्या सुरूवातीपासूनच्या एकंदर वर्तणूकीवरून ही मंडळी आपल्या फायद्यासाठी व प्रसिध्दीसाठी हे आंदोलन करत होते काय असे आता वाटत आहे.

पण   निवडणूकीत सामील होण्याची घोषणा करून या मंडळीनी  भष्ट्राचारविरोधी आंदोलनाची धार बोथट करून टाकली असे मानावयास हरकत नसावी.  

No comments:

Post a Comment