Wednesday, August 29, 2012

न्यायालये अधिक सक्षम असावीत

माझ्या लिखाणामुळे महनीय न्यायालयाचा अवमान होत असेल तर प्रथम मी त्यांची माफी मागतो.

आजकाल भारतात गुन्हेगार उजळ माथ्याने वावरत असतात.राजकीय लोक शेकडो कोटीचे गैरव्यवहार करतात,तो खटला कित्येक वर्ष लांबविला जातो.शेवटी हे लोक निर्दोष सुटतात,वर  काही महिन्याची शिक्षा झालीच तर जेलमध्ये राजेशाही मुक्कामाची सोय केलेली असते.

श्रीमंताची बिघडलेली मुले बेदकारपणे गाडी चालवून रस्त्यावरील लोकांचे बळी घेतात,मुंबई,दिल्ली ,बेंगलोर व अनेक ठिकाणी अशी उदाहरणे घडलेली आहेत.यांना शिक्षा किती मिळते याचा मागोवा घेतला तर 90 टक्क्याहून अधिक केसमध्ये हे लोक निर्दोष सुटलेले आहेत.

आपली काही आदर्श कलाकार मंडळी अंमली पदार्थ बाळगणे,रात्री पार्ट्या करून लोकांना त्रास देणे अशा कामात  अग्रेसर असतात या लोकांना न्यायालय ताकीद देऊन सोडून देते.

वरीलपैकी एखादी घटना सर्वसामान्य नागरिकांने केलेली असली तर न्यायालयाच्या चकरा मारून त्याचे आयुष्य उध्वस्त व्हायची वेळ येते.

भारतातील खूप घटनांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की न्यायालयाच्या निकालात विरोधाभास दिसून येतो.श्रीमंताना व गरिबांना एकच कायदा असतो पण निकाल वेगवेगळा असतो.काही निकाल याला फक्त अपवाद आहेत.

केसचा निकाल लांबला तर श्रीमंताना फारसा फरक पडत नाही पण गरिबांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

ऩ्यायालयाने अधिक सक्षम बनून लवकरात लवकर  कोणत्याही घटनेचा निकाल देणे गरजेचे आहे  तरच लोकांचा न्यायमंदिरावर विश्वास जडेल.तारीख पे तारीख करत सर्वसामान्य लोकांचे आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी आता महनीय न्यायालयाने घेणे गरजेचे आहे.

Tuesday, August 28, 2012

टोलधाड थांबविता येईल का ?

आज महाराष्ट्र सरकार वेगवेगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा हे सुत्र अवलंबत आहे.मुळात एखादा प्रकल्प बनविण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या हजारो पटीने कंत्राटदार नफा कमावतो.जेव्हा तो प्रकल्प सरकारला हस्तांतरण केला जातो तेव्हा तो  वापरण्यायोग्य राहिलेला नसतो.

आज रस्ते विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रात टोलधाड चालू आहे.रस्ते विकास महत्त्वाचा असला तरी तो लोकांच्या सहभागातून करणे शक्य आहे.शासकीय रोखे काढून रस्त्यांचा विकास केला तर कमी खर्चामध्ये रस्त्यांचा विकास करणे शक्य आहे.काही वर्षाकरिता सरकारने जरी स्वत: टोल घेतला तरी त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होऊ शकतो. 

कंत्राटदार रस्ते,धरण,पूल बांधण्यासाठी काही कोटी खर्च करतात व वीस-तीस वर्ष टोल वसूल करून हजारो कोटी वसूल करतात.विशेष गोष्ट नमुद करावी वाटते की त्या कामाचा दर्जाही ठिक नसतो.

सरकारने आता खाजगी कंत्राटदारांना सवलती देण्यापेक्षा कर्जरोखे काढून महाराष्ट्रात वेगवेगळे प्रकल्प राबवावेत जेणेकरून टोलधाडीतून जनतेची मुक्तता होईल.



  




Friday, August 17, 2012

सरकारच्या डोळ्यावर झापड आले आहे का?




दंगलीच्या भितीने जीवाच्या आकांताने हजारो नार्थ-ईस्ट मधील बांधव आपल्या घरी परतत आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना,बांग्लादेशी गुप्तहेर संघटना ,जिहादी संघटना यांनी आखलेल्या कटास यश येण्याची भीती आहे.पध्दतशीरपणे सोशल मिडियाचा वापर करून दंगली भडकविण्याचे कारस्थान रचले गेले.सरकारला दंगलीवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णत: अपयश आले आहे.

आज आसाम हे गेटवे ऑफ बांग्लादेश बनले आहे.स्थानिक आसामी नागरिकांना लक्ष करून बांग्लादेशी घुसखोरांनी आपले प्रस्थान थाटले आहे.मताच्या लाचारीमुळे सरकार काहीच करत नाहीत.पुर्वेकडील राज्यामध्ये आज आपल्याच देशाविषयी असंतोष वाढत आहे.हजारो लोक जर परत पूर्वेकडे गेले तर परत एकदा असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता आहे.  

चिकन नेक नावाने ओळखला जाणारा 24 किमी लांबीचा भूभाग जो भारतास नार्थ-ईस्टकडील राज्यांस जोडतो तो तोडून नवीन देश वसवायचे कारस्थान काही वर्षापासून रचले जात आहे.या भागात बांग्लादेशी घुसखोरांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे.

दररोज सहा हजाराहून अधिक बांग्लादेशी अवैध मार्गाने भारतात प्रवेश करतात.मतासाठी राजकीय दलाल त्यांना ओळखपत्रे,रेशनकार्ड ,निवासी दाखला देण्यास तत्पर असतात.स्थानिक जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी या राजकीय लोकांना निर्वासितांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटतात कारण उद्याची ती त्यांची मतपेढी असते.

सरकारने या निर्वासितांचा बंदोबस्त करून स्थानिकाकडे लक्ष दिले पाहिजे.नाहीतर उद्या भारताची आणखी छकले पडण्याची शक्यता आहे.

सरकार आतातरी आपल्या डोळ्याची झापड उघडेल का ? 
    

  

Tuesday, August 14, 2012

जातीयवाद्यांचा मुंबईला विळखा

आसाम दंगलीचे निमित्त करून मुंबईत दंगल पध्दतशीरपणे  घडविली  गेली.मुळात आसाममधील दंगलीत स्थानिक नागरिकांचे जीवित व वित्तिय नुकसान अधिक झाले आहे.पण समाजविघातक लोकांना दंगलीचे कारण हवे होते.

काही संघटनांना व पक्षांना बांग्लादेशी घुसखोरांचा पुळका का आला ते न कळायला जनता दुधखूळी नाही.मताच्या लाचारीसाठी व धार्मिक फायद्यासाठी बांग्लादेशी घुसखोरांचे लांगुलचालन  राजकारणी लोकांनी चालविले आहे.

स्थानिक लोकांचे अधिकार डावलून या लोकांना महत्त्व दिले तर हेच लोक आपल्यावर उलटतील,मुंबईत घडलेली घटना हे याचे जिंवत उदाहरण आहे.घरी विषारी साप पाळला तर तो आपल्याला कधी तरी चावणारच पण गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या राजकर्त्यांना हे कळणार कधी ????????

या दंगलीत बांग्लादेशी घुसखोर,अंडरवर्ल्डचे लोक ,पाकिस्तानधार्जिने सहभागी झाले होते,सरकारने या लोकांना वेळेच ठेचले पाहिजे नाहीतर हा वणवा महाराष्ट्राच्या इतर भागात पसरायला वेळ लागणार नाही.         

Sunday, August 12, 2012

भारतीय संस्कृतीचे धिंडवडे


आजकाल भारतात काही गल्लाभिरू चित्रपट निर्मात्यांनी  व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचे धिंडवडे चालविले आहे, त्याला सेन्सार बोर्डात बसविलेले ठोकळेसुध्दा जबाबदार आहेत.

मुळात  सेन्सार बोर्डाच्या सदस्यांनी हे पद फक्त मिरविण्याचे साधन बनविले आहे.जिस्म,राज,मर्डर सारख्या चित्रपटांतील अश्लिल दृश्यांना परवानगी देऊन हे सदस्य भारतीय संस्कृतीची चिरफाड करत आहेत आणि काही  गल्लाभिरू निर्मातेही याला तितकेच जबाबदार आहेत.सर्वप्रथम  सेन्सार बोर्डाच्या  ठोकळ्यांची बोर्डातून हकालपट्टी केली पाहिजे.

आज भारतीय मिडियासुध्दा सनी लियोन या  जिस्म चित्रपटाच्या तारकेचा उदोउदो करून तिच्या मुलाखती घेत आहेत हे पाहून भारतातील मिडियाने खालची पातळी गाठली आहे असे वाटू लागले आहे.

एका बाजूला लोकांना भारतीय संस्कृतीचे धडे द्यावयाचे तर दुसऱ्या बाजूला अनैतिक गोष्टींना महत्व द्यावयाचे यावरून भारतीय मिडियाचा दुटप्पीपणा उघडा पडला आहे.

मुळात भारतीय मिडियाला  नैतिकता उरली आहे तरी कुठे ?


        

Thursday, August 9, 2012

अण्णांच्या भष्ट्राचारविरोधी आंदोलनाची इतिश्री

भष्ट्राचारविरोधी आंदोलनाची इतिश्री

लोकपाल आंदोलन तडीस नेण्याची गर्जना करणाऱ्या टीम अण्णाने शेवटी नांगी टाकलीच.या टीमने भीमगर्जना करत निवडणूकीत सामील होण्याची घोषणा केली.निवडणूकीमुळे या मंडळीचा भष्ट्राचाराचा मुळ मुद्दाच बाजूला होण्याची शक्यता जास्त आहे.

कारण निवडणूकीसाठी ही मंडळी कोणाचा पैसा वापरणार आहेत हेच मोठे गुढ आहे.कारण भष्ट्र मंडळी,काळा पैसावाले,लुटारू व्यावसायिक हेच आपल्या फायद्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना देणग्या देतात.

या टीममधील मंडळीच्या सुरूवातीपासूनच्या एकंदर वर्तणूकीवरून ही मंडळी आपल्या फायद्यासाठी व प्रसिध्दीसाठी हे आंदोलन करत होते काय असे आता वाटत आहे.

पण   निवडणूकीत सामील होण्याची घोषणा करून या मंडळीनी  भष्ट्राचारविरोधी आंदोलनाची धार बोथट करून टाकली असे मानावयास हरकत नसावी.