माझ्या लिखाणामुळे महनीय न्यायालयाचा अवमान होत असेल तर प्रथम मी त्यांची माफी मागतो.
आजकाल भारतात गुन्हेगार उजळ माथ्याने वावरत असतात.राजकीय लोक शेकडो कोटीचे गैरव्यवहार करतात,तो खटला कित्येक वर्ष लांबविला जातो.शेवटी हे लोक निर्दोष सुटतात,वर काही महिन्याची शिक्षा झालीच तर जेलमध्ये राजेशाही मुक्कामाची सोय केलेली असते.
श्रीमंताची बिघडलेली मुले बेदकारपणे गाडी चालवून रस्त्यावरील लोकांचे बळी घेतात,मुंबई,दिल्ली ,बेंगलोर व अनेक ठिकाणी अशी उदाहरणे घडलेली आहेत.यांना शिक्षा किती मिळते याचा मागोवा घेतला तर 90 टक्क्याहून अधिक केसमध्ये हे लोक निर्दोष सुटलेले आहेत.
आपली काही आदर्श कलाकार मंडळी अंमली पदार्थ बाळगणे,रात्री पार्ट्या करून लोकांना त्रास देणे अशा कामात अग्रेसर असतात या लोकांना न्यायालय ताकीद देऊन सोडून देते.
वरीलपैकी एखादी घटना सर्वसामान्य नागरिकांने केलेली असली तर न्यायालयाच्या चकरा मारून त्याचे आयुष्य उध्वस्त व्हायची वेळ येते.
भारतातील खूप घटनांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की न्यायालयाच्या निकालात विरोधाभास दिसून येतो.श्रीमंताना व गरिबांना एकच कायदा असतो पण निकाल वेगवेगळा असतो.काही निकाल याला फक्त अपवाद आहेत.
केसचा निकाल लांबला तर श्रीमंताना फारसा फरक पडत नाही पण गरिबांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.
ऩ्यायालयाने अधिक सक्षम बनून लवकरात लवकर कोणत्याही घटनेचा निकाल देणे गरजेचे आहे तरच लोकांचा न्यायमंदिरावर विश्वास जडेल.तारीख पे तारीख करत सर्वसामान्य लोकांचे आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी आता महनीय न्यायालयाने घेणे गरजेचे आहे.