Monday, July 30, 2012

मॉं,माटी आणि मानुष

आपल्या स्वत:च्या भूमीत परकीयाचे होणारे आक्रमण,भूमिपुत्रांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करते.आज महाराष्ट्रासह काही पुढारलेल्या राज्यात हीच परिस्थिती आहे.

ईशान्येकडील राज्ये आसाम,अरूणाचल प्रदेश,मेघालय,मिझोराम,नागालँड,मणिपुर आणि त्रिपुरा ज्यांना सात भगिनी असेही म्हटले जाते तेथे आज परिस्थिती खूपच चिघळलेली आहे आणि याला कारणीभूत आजचे राजकर्ते आहेत.बांग्लादेशी घुसखोरांनी ईशान्य भारतातील भूमिवर उच्छाद मांडला आहे.दडपशाहीने तसेच धर्मांतर करून त्यांनी स्थानिकांचे वर्चस्व संपविले आहे.आज तेथील स्थानिक बोडो,आसामी,नागा ,संथाली अशा अनेक आदिवासी जमातीचे आस्तित्व संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती आहे.

आज सीमावर्ती भागात या घुसखोरांची संख्या स्थानिकापेक्षा वाढली आहे.आपल्या लोकसंख्येच्या जोरावर आणि स्थानिक राजकर्त्यांना हाताशी धरून या लोकांनी भूमिपुत्रांना त्रास द्यावयास सुरूवात केली आहे.

सध्या चालू असलेले आसाममधील दंगे हे याचेच उदाहरण आहे,पण मताला लाचार झालेल्या राजकर्त्यांना भूमिपुत्रांचे दु:ख थोडेच कळणार आहे आज आसाममध्ये भूमिपूत्रांचा पेटलेला वणवा वेळीच विझवला नाही तर संपूर्ण ईशान्य भारत आपण गमावून बसविण्याची भीती आहे.

आपले परकीय शत्रू यासाठीच तर आसुसलेले आहे,पण राजकर्त्यांना भूमिपुत्रांचे अश्रु पुसायला वेळ आहे कुठे ?

No comments:

Post a Comment