Thursday, July 19, 2012

भारताचे कचखाऊ परराष्ट्रीय धोरण

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे परराष्ट्रीय धोरण अगदी कीव करण्याजोगे आहे.

इवलासा पाकिस्तान आपला फणा काढून नेहमीच  फुरफूरत असतो.पूर्वेच्या व उत्तरेच्या सीमा चीन गिळंकृत करत आहे.

पूर्वकडे बांग्लादेशीयांचे लोंढे वाढत आहेत.आपण मात्र प्रत्येक वेळी सहिष्णूतेचे धोरण अमलात आणूऩ डोळ्यावर कातडी पांघरून बसलो आहे.

परकीयांच्या आक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिल्लीचे राजसिंहासन पृथ्वीराज चौहानाच्या ताब्यातून जाऊन परकीयांच्या ताब्यात आले .हीच चूक आपण परत एकदा करतो की काय याची भीती वाटत आहे,आता दिल्लीच नाही तर संपूर्ण देशातच असुरक्षित वातावरण आहे.आज देशात सर्वसामान्य नागरिक,महिला सुरक्षितपणे रस्त्यावर फिरू शकत नाहीत.

समोरासमोर युध्द करता येत नसल्यामुळे चीन पाकिस्तान ,नेपाळचा वापर आपल्याविरूध्द करत आहे.नेपाळची राजेशाही संपवून माओवादी सत्ता आणण्यास चीनच कारणीभूत आहे.

आज भूतान सारख्या छोट्या देशावर त्याची नजर आहे.भूतानमध्ये मार्क्सवादी विचारसरणीच्या पक्षाचे प्राबल्य वाढत आहे.जी गोष्ट नेपाळमध्ये केली तीच चीन भूतान मध्ये करू पाहात आहे,पण आपल्या राजकर्त्यांच्या नजरेत ही गोष्ट कधी येणार हेच कळत नाही.   

चीनने पोसलेला  लाल नक्षलवाद तर आपल्या दारात आहे.याला आपण वेळीच ठेचले नाही तर उद्या आपलीही अवस्था बिकट होणार आहे.दरवेळी अमेरिकेकडे आशाळभूत नजरेने पाहण्यात काहीच उपयोग होणार नाही.इस्त्रायल सारखे आक्रमक धोरण अवलंबून आपण परकीय तसेच नक्षल्यांचा कायमचा बंदोबस्त  केला पाहिजे.

आपले परकीय धोरण बदलायची वेळ येऊन ठेपलेली आहे.


No comments:

Post a Comment