Monday, July 30, 2012

मॉं,माटी आणि मानुष

आपल्या स्वत:च्या भूमीत परकीयाचे होणारे आक्रमण,भूमिपुत्रांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करते.आज महाराष्ट्रासह काही पुढारलेल्या राज्यात हीच परिस्थिती आहे.

ईशान्येकडील राज्ये आसाम,अरूणाचल प्रदेश,मेघालय,मिझोराम,नागालँड,मणिपुर आणि त्रिपुरा ज्यांना सात भगिनी असेही म्हटले जाते तेथे आज परिस्थिती खूपच चिघळलेली आहे आणि याला कारणीभूत आजचे राजकर्ते आहेत.बांग्लादेशी घुसखोरांनी ईशान्य भारतातील भूमिवर उच्छाद मांडला आहे.दडपशाहीने तसेच धर्मांतर करून त्यांनी स्थानिकांचे वर्चस्व संपविले आहे.आज तेथील स्थानिक बोडो,आसामी,नागा ,संथाली अशा अनेक आदिवासी जमातीचे आस्तित्व संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती आहे.

आज सीमावर्ती भागात या घुसखोरांची संख्या स्थानिकापेक्षा वाढली आहे.आपल्या लोकसंख्येच्या जोरावर आणि स्थानिक राजकर्त्यांना हाताशी धरून या लोकांनी भूमिपुत्रांना त्रास द्यावयास सुरूवात केली आहे.

सध्या चालू असलेले आसाममधील दंगे हे याचेच उदाहरण आहे,पण मताला लाचार झालेल्या राजकर्त्यांना भूमिपुत्रांचे दु:ख थोडेच कळणार आहे आज आसाममध्ये भूमिपूत्रांचा पेटलेला वणवा वेळीच विझवला नाही तर संपूर्ण ईशान्य भारत आपण गमावून बसविण्याची भीती आहे.

आपले परकीय शत्रू यासाठीच तर आसुसलेले आहे,पण राजकर्त्यांना भूमिपुत्रांचे अश्रु पुसायला वेळ आहे कुठे ?

Friday, July 27, 2012

एकदिवसीय पावनखिंड मोहिम,अविस्मरणीय अनूभव


पावनखिंडीच्या एकदिवसीय मोहिमेचे उत्सुकता एक महिन्यापासून डोक्यात होती.पन्हाळा ते पावनखिंड हे अंतर अंदाजे 55 ते 60 कि.मी. असल्यामुळे एका दिवसाची ही मोहिम पूर्ण करू शकेन याबद्दल मी स्वत:च साशंक होतो.डॉ.अमर आडके,बी.बी.पाटील,हणमंतराव नलावडे,विद्याधर दुर्गूळे,दिपक सावेकर आदि कसलेल्या शिलेदारांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम होणार होती,त्यामुळे थोडासा निर्धास्तपण होतो.

मोहिमेची पूर्वतयारी म्हणून शूज,खाण्याचे पदार्थ तसेच मोहिमेदरम्यान येणाऱ्या गावातील लहान मुलांना वाटण्यासाठी बिस्किटे,चॉकलेट आदि पदार्थ सोबत घेतले.
मोहिमेची सुरूवात,बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशिद यांच्या पुतळ्यास वंदन करून झाली 
पहाटे साडेतीन वाजता गंगावेश(कोल्हापूर)येथे सर्वांना जमा होण्यास सांगितले होते.मोहिमेचा विचार करतच मी रात्री झोपी गेलो.झोपताना वाटून गेले की पहाटे लवकर उठलो नाही तर मोहिमस जाता येणार नाही.पण मनात प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.मला तीन वाजण्याच्या अगोदरच जाग आली.मी सामानाची आवराआवर करून गंगावेसकडे निघालो.

जंगलातून वाटचाल
गंगावेसला अगोदरच बरेच मावळे आले होते.चार वाजता सर्वजण पन्हाळ्याकडे निघाले.पाच वाजण्याच्या सुमारास वीर शिवा काशीद तसेच बाजीप्रभूच्या पुतळ्यास वंदना करून सर्वजण राजदिंडीमार्गे विशाळगडाच्या मार्गाकडे निघाले.याच मार्गावरून छत्रपती शिवाजीराजे सिद्दी जौहरच्या तावडीतून निसटून विशाळगडाकडे गेले होते.आज आम्ही सर्वजण त्याच मार्गाने पावनखिंडीकडे चाललो होतो.सुरूवातीच्या काही मिनिटातच पावनखिंडीच्या मोहिमेतील अवघडपणा लक्षात आला.पहाटेची वेळ असल्यामुळे प्रकाश थोडासा अंधूकसा होता त्यामुळे सर्वजणांनी विजेऱ्यांचा आधार घेत मार्गक्रमण करण्यास सुरूवात केली.

अंधारातून मार्गक्रमण
साडेतीनशे वर्षापूर्वी बारा जुलैच्या रात्री याच मार्गाने मशालींचा वापर करून छत्रपती कसे निसटले असतील असा विचार मनी करत मी मार्गक्रमण करत होतो.छत्रपती वेढ्यातून निसटले ती रात्र पोर्णिमेची होती.मुसळधार पाऊस,ढगाळ हवामान,घनदाट जंगल याशिवाय सिद्दीच्या सैनिकांचा पाठलाग अशा परिस्थितीत आपल्या लाडक्या राजाला विशाळगडाला पोहचविणे मावळ्यांना किती जिकिरीचे होते हे पावनखिंडीचा मार्गाने जाताना हळूहळू कळू लागले.


थोडीसी विश्रांती
राजदिंडीतून खाली उतरून तुरूकवाडी,म्हाळूंगे पार करून आम्ही मसाई पठार चढू लागलो.मार्गावर मोठमोठाले दगड,निसरडा रस्ता,सोबत पावसाची 
साथ यामुळे सर्व मावळ्यांची पुरती दमछाक होऊन गेली.मसाई पठारावर पोहचल्यावर थोडासा आराम करून आम्ही पठार चालू लागलो.मसाई पठार म्हणजे जणू काही सह्याद्रीचे छप्पर आहे.


अंदाजे दहा ते बारा कि.मीलांब असणाऱ्या विशाल अशा पठारवरून दिसणारे पन्हाळ्याचे सुंदर रूप डोळ्यात साठवून सर्व मावळ्यांनी मसाई पठार पार केले.
मसाई  पठारानंतर कुंभारवाडीचाफेवाडीमांडलाईवाडीचा टप्पा पार करून सर्वांनी न्याहारी घेऊन थोडासा आराम  केलापावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अगदी खुलून गेलेले असतेडोंगरउतारावरील भातशेतीहिरवीगार वनराईगर्द झाडी,धबधबे जंगलातून गेलेली पायवाट जणून काही सृष्टीच्या चित्रकारांने आपले सर्व रंग उधळले आहेत.
मुलांना खाऊ वाटप 

वाटेत ठिकठिकाणी लहान मुलांना खाऊचे वाटप करत मावळ्यांचे मार्गक्रमण चालू होते. मोहिमेदरम्यान येणाऱ्या ओढ्यात आंधोळ करून ताजेतवाने होऊन सर्वजण परत नव्या जोमाने चालू लागले.मांडलाईवाडीनंतर करपेवाडीआंबेवाडी,


कळकेवाडीपाटेवाडीसुक्यामाचा माळ,मासावडे करत सर्वजण पांढरेपाणी या ठिकाणी पोहचलोपांढरेपाणी ते पावनखिंड हे अंतर अंदाजे सात कि.मीआहे.

पावनखिंडीत पोहचल्यावर शिवरायांची वंदना करून,धारातीर्थी पडलेल्या सर्व पराक्रमी मावळ्यास वंदन करून पुढील वर्षी परत येणाचा निर्धार करून मोहिमेची सांगता झाली.कोल्हापूरपुणे,नाशिक,मुंबई आदि ठिकाणाहून अंदाजे दिडशे मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते.

इतिहासात प्रसिध्द असणाऱ्या पावनखिंडीच्या युध्दाची सुरूवात पांढरेपाणी या ठिकाणाहून झाली होती व शेवट पावनखिंडीत झाला.बाजीप्रभूफुलाजीप्रभूहैबतराव शिळीमकररायाजी बांदल आदि पराक्रमी मावळ्यांनी जिवाची बाजी लावून खिंड लढविली.सतत बारा तास चालून दमलेल्या तीनशे मराठ्यांनी थकून न जाता आदिलशाहच्या विशाल अशा सेनेबरोबर नऊ तास झुंजून खिंड रोखून धरली त्यामुळे छत्रपती शिवरायांना विशाळगडाकडे जाण्यास अवधी मिळाला.


मोहिमेची सांगता
बाजींच्या देहाची चाळण झाली असतासुध्दा त्यांचे कान विशाळगडाकडे लागले होते,कारण महाराज विशाळगडावर पोहचल्यानंतर तोफेची सलामी होणार होती.इकडे विशाळगडावर आदिलशाहच्या सरदारांचा वेढा लागला होता.तो वेढा तोडून महाराज विशाळगडावर पोहचले आणि तोफेची सलामी झाली.

तोफेचा आवाज ऐकल्यानंतर बाजींनी आपले प्राण सोडले,घोडखिंड कायमची इतिहासात पावन झाली.पावनखिंडीतल्या या रणसंग्रामात सर्वच्या सर्व तीनशे मावळे मारले गेले.

धन्य ते वीर ,धन्य ती त्यांची स्वराज्यनिष्ठा






Thursday, July 19, 2012

भारताचे कचखाऊ परराष्ट्रीय धोरण

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे परराष्ट्रीय धोरण अगदी कीव करण्याजोगे आहे.

इवलासा पाकिस्तान आपला फणा काढून नेहमीच  फुरफूरत असतो.पूर्वेच्या व उत्तरेच्या सीमा चीन गिळंकृत करत आहे.

पूर्वकडे बांग्लादेशीयांचे लोंढे वाढत आहेत.आपण मात्र प्रत्येक वेळी सहिष्णूतेचे धोरण अमलात आणूऩ डोळ्यावर कातडी पांघरून बसलो आहे.

परकीयांच्या आक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिल्लीचे राजसिंहासन पृथ्वीराज चौहानाच्या ताब्यातून जाऊन परकीयांच्या ताब्यात आले .हीच चूक आपण परत एकदा करतो की काय याची भीती वाटत आहे,आता दिल्लीच नाही तर संपूर्ण देशातच असुरक्षित वातावरण आहे.आज देशात सर्वसामान्य नागरिक,महिला सुरक्षितपणे रस्त्यावर फिरू शकत नाहीत.

समोरासमोर युध्द करता येत नसल्यामुळे चीन पाकिस्तान ,नेपाळचा वापर आपल्याविरूध्द करत आहे.नेपाळची राजेशाही संपवून माओवादी सत्ता आणण्यास चीनच कारणीभूत आहे.

आज भूतान सारख्या छोट्या देशावर त्याची नजर आहे.भूतानमध्ये मार्क्सवादी विचारसरणीच्या पक्षाचे प्राबल्य वाढत आहे.जी गोष्ट नेपाळमध्ये केली तीच चीन भूतान मध्ये करू पाहात आहे,पण आपल्या राजकर्त्यांच्या नजरेत ही गोष्ट कधी येणार हेच कळत नाही.   

चीनने पोसलेला  लाल नक्षलवाद तर आपल्या दारात आहे.याला आपण वेळीच ठेचले नाही तर उद्या आपलीही अवस्था बिकट होणार आहे.दरवेळी अमेरिकेकडे आशाळभूत नजरेने पाहण्यात काहीच उपयोग होणार नाही.इस्त्रायल सारखे आक्रमक धोरण अवलंबून आपण परकीय तसेच नक्षल्यांचा कायमचा बंदोबस्त  केला पाहिजे.

आपले परकीय धोरण बदलायची वेळ येऊन ठेपलेली आहे.