Tuesday, October 18, 2011

भारतातील तथाकथित मुर्ख बुध्दिवादी

आजकाल लोकांना थोडी प्रसिध्दि मिळाली की व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही ओकायला ते  सुरूवात करतात.भारतातील काही तथाकथीत समाजसेवी मंडळी आहेत जे समाजसेवेच्या नावाखाली(N.G.O)आपले दुकान चालवतात.एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला की यांना गगण ठेंगणे वाटू लागते.भारतात आपणच बुध्दिवादी आहोत हा मुर्ख भ्रम मनात ठेवून भारताच्या सार्वभौमत्वाला,आंतरराष्ट्रीय हिताला बाधा पोहचणारी विधाने ते करतात.

काश्मीर प्रश्न,पूर्वेकडील प्रश्न,नक्षली चळवळी यांच्याबदल या लोकांना खूप कळवळा आहे.आंतरराष्ट्रीय संस्था या लोकांना मदत करून यांचा वापर भारतविरोधी कारवायाकरिता करतात.  

या मुर्ख लोकांना महत्व देऊन आपली मिडिया त्यांना आणखी मोठे बनविते.या तथाकथित समाजसेवी लोकांना आपण आता किती महत्व द्यावयाचे हे ठरविण्याची वेळ आता आजच्या पिढीवर आली आहे.आपण वेळीच या लोकांपासून सावध झालो नाही,तर ही कीड संपुर्ण भारतात पसरायला वेळ लागणार नाही.