Sunday, September 11, 2011

होय,मला बदल हवा आहे.

विशाल अशा खंडप्राय भारत देशात आजकाल फुटीरतेचे वारे वाहू लागले आहेत.प्राचीन कालखंडात जगातील सर्वात सुखी व संपन्न मुलूख असलेल्या आपल्या देशाची आजची अवस्था अत्यंत विदारक अशी बनली आहे.

बांग्लादेशी,पाकिस्तानी घुसखोर देशाच्या विविध भागात अगदी आरामात राहत आहेत.मताच्या राजकारणासाठी मतलबी राजकीय पक्षांनी त्यांना रेशनकार्डासह सर्व सुविधा पुरविल्या आहेत.याच लोकांना हाताशी धरून परकीय आतंकवादी संघटना देशभरात उच्छाद मांडत आहेत.पुर्वेकडील राज्यामध्ये बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर आहे,त्यातच चीन सारखे साम्राज्यवादी देश सीमेभोवती आपला पाश आवळत आहेत.पण कुणाला याची फीकिर आहे?.

भारतीय मिडिया क्रिकेट,बॉलिवुड किंवा एखाद्य़ा राजकारण्याची बातमी देण्यात धन्यता बाळगत आहे.
काही लोक सोडले तर बहुतेक  राजकारणी गेंड्याची कातडी पांघरून फक्त आपला व आपल्या पुढील पिढीचा विचार करत आहेत.मनाला वाटते हे कधी बदलणार आहे की नाही,आपल्या देशाला पुर्वी सारखे वैभव प्राप्त होणार आहे की नाही?.

आज भष्ट्राचार,आतंकवादी हल्ले,गरिबी या मुद्यांनी देश होरपळून गेला आहे.भारतमाता आजच्या तरूण युवकांकडे मोठ्या आशेने पाहात आहे कारण उद्या तेच बदल घडविणार आहेत. .........

No comments:

Post a Comment