Monday, June 13, 2011

राष्टकुल,आदर्श,स्पेक्टम घोटाळा व मीडियाचा प्रामाणिकपणा

सन 2010-11 हे  घोटाळ्याचे वर्ष म्हणून भारतीय इतिहासात गणले जाईल. पहिला काही हजार कोटीचा राष्ट्रकूल घोटाळा उघडकीस आला.इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडियामध्ये या घटनेबद्दल वार्तालाप चालू झाला.ही घटना संपण्यापूर्वीच आदर्श घोटाळा उघडकीस आला,ज्यामध्ये सैनिकांच्या कुटूंबियासाठी साठी राखीव असलेल्या भूखंडावर राजकारणी व सरकारी बाबूंनी संगतमताने डल्ला मारला.हा विषय मीडियामध्ये चघळला जात असताना लाखो कोटी रूपयांचा स्पेक्टम घोटाळा उघडकीस आलो.पहिले दोन विषय बाजूला पडले मीडिया याच विषयावर बोलू लागले.

लोकसुध्दा काही दिवस या घोटाळ्यांची गोष्टीची चर्चा करतात व नंतर विसरून जातात.भारतीय इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडिया प्रामाणिक काम कधी करणार हाच मोठा प्रश्न आहे.
  
देशामध्ये सध्या नक्षली धूमाकुळ घालत आहेत.शेकडो पोलिसांचे बळी गेले आहेत याकडे मीडियाचे लक्ष नसते.चीन आपले साम्राज्यवादी पंख पसरत आहे,पाकिस्तान सतत कुरापत काढत असतो.पूर्वेकडे बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.या महत्वाच्या विषयी चर्चा करण्याऐवजी भारतीय इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडियातील काही लोक पैसे घेऊन काम करतात(पेड न्युज)तसेच टी.आर.पी वाढावा यासाठी आपणांस हव्या तश्या बातम्या देतात.

देश्याच्या मुख्य प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी भारतीय इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडिया आज पुर्णपणे भरकटला आहे आणि यापेक्षा मोठे दुदैव ते कोणते.